नवा पाऊस नकोसा...
ओघळतोय,ओसरतोय लहरी मनात बांधतोय... रात्री पासून 'तिमिर' शांततेत तो सरी वर सरी कोसळतोय... आठवणींचा 'डोंगर'घर करुनी रडतोय मनाच्या खोलीत जावून पाऊस मात्र हसतोय... "करोना महामारीच्या"काळात तो असंख्य,मानव जातील शांत लहरींची 'उब'देतोय... पण,याचा आस्वाद घ्येण्यासाठी मन कुठेतरी घाबरतय,का कधी एखादा थेंब तरी कुणाचं आयुष्य दूर करतंय, ह्या जाणीवेने मन अस्वस्थ होतंय... कित्येक साथीदार, हितचिंतक ह्या नव्या पावसाच्या शहरात कोरडे भिजून, तुमची-आमची आठवण काढून सहज पाण्यात 'तृप्त' होतायेत... का?कुणास ठाऊक...,ह्या पावसाने मन क्षणभर सुखावतय... पण, ह्या अस्थिरतेच्या 'घालमेलीच' जणू 'रोपटं' वाढत मनस्थिती दुखावतेय... #पाऊस#हलक मन#परिस्थिती#आठवणी#भयाण शांतता#द्विधा मनःस्थिती...


